Subscribe Us

दिवाळी सण संपूर्ण माहिती Diwali Information In Marathi

 दिवाळी सण संपूर्ण माहिती

Diwali Information In Marathi 



दिवाळी सर्व सणांची राणी आहे असे म्हटले जाते. भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी या सणाचे सर्व सणांमध्ये खूप महत्त्व आपल्याला दिसून येते. भारत देशात दिवाळी आश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

दिवाळी ही खूप मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्त्व लोक आजही जाणतात. दिवाळीच्या दिवशी सर्व घरातील लोक नवीन कपडे परिधान करतात. तसेच फटाके, फुलझडी, लाइटिंग इत्यादी साधनांनी दिवाळीचे स्वागत करतात. नवनवीन पदार्थ दिवाळी सणानिमित्त प्रत्येकाच्या घरी करत असतात दिवाळीच्या दिवशी घराबाहेर रांगोळी काढून सुशोभित केले जाते.

दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.

धनत्रयोदशी: दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी असते. या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने, चांदी तसेच धनाची देवी धन्वंतरीची पूजा करून अभिषेक करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी देवी धन्वंतरी दिवस असतो.


नरक चतुर्थी: दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्थी हा दिवस छोटी दिवाळी म्हणून गणला जातो. हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात. महिला हातांवर मेंदी काढतात, दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो, मुलांना उपहार दिले जातात, त्यानंतर लक्ष्मीपूजन असते.

लक्ष्मीपूजन: या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि योग्य चालीरिती रिवाजात माता लक्ष्मी, श्री गणेश आणि माता सरस्वती यांची पूजा केली जाते. या देवी देवतांना आमंत्रीत केले जाते. घरात नेहमी वास करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी दरवाजे खिडक्या व तिजोऱ्या खुले ठेवले जातात. तेथे सुंदर दिव्यांची सजावट व रांगोळी काढली जाते.

पूजा रितीरिवाजाप्रमाणे पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनाच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणित केले जाते. गोड पदार्थ यांचा नैवेद्य दाखवला जातो. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभकामना दिल्या जातात. या दिवशी व्यापारी व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.

गोवर्धन पूजा: दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो. या दिवशी विवाहित दंपती एकमेकांना छानसे उपहार देवून खुश करण्याचा प्रयत्न करतात. आजही बरेच लोक भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा सुद्धा करतात. ग्रामीण भागातील घरातील पशूंना विशेष गाई, बैल, म्हशी वगैरे यांना सजवून दिवाळीचे मिष्टान्न खायला देतात.

 

भाऊबीज: दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या अतुट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला दिव्यांच्या आरास मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्याच्या समृद्धी व भरभराटीचे शुभकामना करते. भाऊ बहिणीला छानसे उपहार देऊन खूष करतात व आपल्या नात्याला अधिक मधुर बनविण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस रक्षाबंधनासारखा आहे. तसाच पवित्र मानला जातो.

 

विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरू हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात. नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात

 

या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात. फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे. केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि [विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.

हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी, गयाना, भारत, मलेशियामॉरिशस, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान,] सिंगापूर,  श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.

 

प्राचीनत्व

उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[३४] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.

 

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.

 


पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधी काळातच हा सण येत असतो. दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. असं पुराणानुसार माहिती पडते. या सणाचा प्रारंभ फार प्राचीन काळी करण्याचे वास्तव्य उत्तर ध्रुवप्रदेशात त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्याची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होतात. त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करीत असावेत.

 

तसेच वैद्य काळात अश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आष्विक किंवा आग्रहासारखे केले जात असत ज्याचा समावेश सात पाकयज्ञामध्ये होतो. परंतु धार्मिक आचरणात दिवाळीचे प्राचीन महत्त्व आपल्याकडून येते. काही लोकांची अशी श्रद्धा आहे, की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेस अयोध्येला परत आले. तो ह्याच दिवसात पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्या पेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यशाचा उत्सव मानला जायचा.

 

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात. घराच्या दारात आकाश दिवे लावतात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात, धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची कल्पना आपल्याला नाही.

 

दिवाळीचे महत्त्व:

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दारात तसेच घरावर इमारतीवर दिव्यांनी लख्ख प्रकाश केला जातो. याचाच अर्थ असा की आपल्या अंधारमय जीवनाला प्रकाशमय करावे हेच महत्त्व आपल्याला दिवाळीचे दिसून येते. तसेच दिवाळी हा सण आनंदाचा व उत्साहाचा सण मानला जातो. त्यातूनच आपल्याला जगण्याचे बळ मिळते.

 

तसेच या दिवशी महालक्ष्मी, सरस्वती व गणपती यांची पूजा होते. आपल्या घरातील धनसंपत्ती हे लक्ष्मी रूपाने सतत आपल्यासोबत असते. सरस्वती म्हणजेच आपली बुद्धी, वाचा नेहमी सरस्वती रूपाने आपल्या जवळ असते व गणपती अनेक संकट हरत असतो. म्हणून या दिवशी या तिघांचीही पूजा केली जाते. तसेच श्री राम प्रभू सीता मातेला घेऊन याच दिवशी आयोध्याला परत आल्याने हा हर्ष व्यक्त केल्या जातो असेही म्हटले जाते.

 

दिवाळी कशी साजरी करतात:

दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हिंदू धर्मामध्ये पार पाडल्या जातो. दिवाळीला आंब्याच्या पानाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्य प्रवेश दाराला लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. अशा प्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते की रांगोळी हिंदू धर्मानुसार शुभकारक आहे. त्याचबरोबर घराच्या चारही बाजूंना तेलाचे दीपक रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी दिपोत्सव म्हणून ओळखली जाते.

 

या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यता महिला देखील साडी, सोन्याचे दागिने खरेदी करतात. पारंपारिक पद्धतीने आणि तंत्र तज्ञांच्या मते, या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक सोने-चांदी खरेदी करतात.

 

दिवाळी साजरी करणे म्हणून हे जरी कारण असले, तरी बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण दिसून येते. तर दरवर्षी लोक मिठाई, कपडे आणि जरुरी वस्तू व सेवा भूषणाच्या दुकानावर मोठी गर्दी करतात. सामान्य माणूसही यावेळी मनमोकळेपणाने खरेदी करतो. दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. हा उत्सव खूपच मनोरंजक असतो. लोक एक-दोन आठवडे आधीच दिवाळीच्या तयारीला सुरुवात करतात. त्यामध्ये घराची साफसफाई, रंगरंगोटीचा समावेश आणि कपडे तसेच जरुरी वस्तू खरेदी करतात.

 

 

दिवाळी विषयी पौराणिक कथा:

दिवाळी विषयी अनेक कथा आहेत. एक कथा ती म्हणजे याच दिवशी श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून घरी परतले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावून घराला तोरणे लावून हा उत्सव साजरा केला गेला.

दुसरी कथा म्हणजे एक दृष्ट व्यक्ती सर्वांना खूप त्रास द्यायचा. त्याचा पराभव झाल्यावर मरतांना त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली असता, तेव्हा त्याने त्याची शेवटची इच्छा सांगितली, त्याच्या पृथ्वीवरच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने दिवे लावावेत आणि अज्ञानरुपी अंधकार दूर करून त्याच्या मृत्यूचा उत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने युद्धात त्याला पराजित केले होते. त्याचे नाव नरकासुर असे होते.

नरकासुर खूप शक्तिशाली राक्षस होता. तो जिथे जायचा तेथील लोकांना नरकासारखे कष्ट द्यायचा. कोणताही पुरुष त्याचा सामना करू शकत नव्हता. पण जेव्हा एक महिला त्याच्यासमोर आली तेव्हा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले, त्याने विचार केला. एक स्त्री काय करू शकते? पण खरे तर त्या महिलेने श्रीकृष्णाच्या पत्नीनेच नरकासुराचा वध केला. त्यामागे श्रीकृष्णच होते. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली असता, त्याने म्हटले, “माझ्या मृत्यूने सर्वांच्या जीवनात प्रकाश यावा.तेव्हापासून सर्व लोकांनी जास्तीत जास्त दिवे प्रज्वलित केले आणि जीवनाचा उत्सव साजरा केला. तेव्हापासून दिवाळी सुरू झाली, अशी ही कथा आहे.

 


Post a Comment

0 Comments